सरकार बदलले ही केवळ भावनिक स्थिती असून व्यवस्थात्मक बदल होत नाही असे शिक्षणतज्ञ किशोर दरक यांनी म्हटले आहे ते खरंच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने प्रश्न न सोडवल्यामुळे भाजप सरकार प्रश्न सोडवेल या मोठ्या आशेने सगळ्यांनी भरघोस मतदान केले. पण शेवटी निराशा झाली. आताही सरकार बदलले पण मंत्रालयातील अधिकारी आणि त्यांची धोरणं तीच आहेत. मागील एका वर्षात माननीय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वात शिक्षण विभागाने काढलेले शासन निर्णय मागची पुनरावृत्ती असल्यासारखेच आहेत.
कोरोना काळात शिक्षण आणि शिक्षणाचे नियोजन करण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरल्याचे दिसत आहे. अकरावीचे ऑनलाईन प्रवेश सुरू झालेले नाहीत, दहावी-बारावीच्या यावर्षीच्या परीक्षा कधी होणार माहित नाही, शाळा सुरू करण्याबाबत केवळ घोषणा होतात पण ठोस नियोजन नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या नावावर अध्ययन-अध्यापन अहवाल मागवले जातात पण जी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकली नाहीत त्यासाठीचे कोणतेही नियोजन नाही.
ऑनलाइन शिक्षणाचा बागुलबुवा उभा करून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना वेठीस धरण्याची एकही संधी सोडत नाहीत.
कोरोनाचे कारण देवून अनुदानाचा टप्पा मात्र देण्याचे टाळण्यात सरकार यशस्वी ठरले आहे. प्रचलित नुसार शंभर टक्के अनुदान द्यायचं तर राहीलच पण 20 टक्के अनुदान देतानाही 18 महिन्यांचा पगार ढापण्यात सरकारने केलेली लबाडी लपून राहिलेली नाही. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ ग्रॅज्यूटीचे पैसे आणि सेवानिवृत्तीवेतनाचे कोणतेही लाभ मिळालेले नाहीत. सातव्या वेतन आयोगातील थकबाकीचा पहिला हप्ता थांबवण्यात आलेला आहे. सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन (शिक्षणसेवक) आजही केवळ सहा हजार रुपये मानधनात काम करत आहे. बक्षी कमिटीने सुचवलेली आश्वासित प्रगती योजना अद्यापि लागू झालेली नाही. 2004 पासून थांबलेली शिक्षकेतर कर्मचारी भरती सुरू झालेली नाही. बारा वर्षे व चोवीस वर्षाचे कोणतेही लाभ न घेता हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी निवृत्त होऊन गेलेले आहेत. आजही शिक्षक 27 पेक्षा जास्त अशैक्षणिक कामे करत आहेत. शिक्षकांना शाळेमध्ये शिकवू दिले जात नाही. कामाचे मूल्यमापन करण्याची मात्र वारंवार मागणी करणारे आत्ताच्या सरकारमधील आणि मागच्या सरकारमधील एकाच पकडीचे दोन दांडे आहेत.
सार्वजनिक प्रवासाची साधने सुरू झालेली नाहीत, कोरनाचे व्हॅक्सीन अजून आलेले नाही पण पन्नास टक्के शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित करण्याचा जीआर मात्र काढलाय. शाळेत मुलं नसताना शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचारी यांना बोलवायचे कारण काय? हे मात्र शिक्षण विभागाने सांगितलेलं नाही.
50% शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बाबतच्या शासन निर्णयामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे
1) शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासह सर्व प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर असावे.
2) प्रत्येक प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटायझर बसवावे.
3) शाळेत प्रवेश करण्यापूर्वी गणवेश आणि पादत्राणांचे सानिटायझेशन करावे.
4) गेटजवळ विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, यांचे नियंत्रण करावे.
5) वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे.
6) वर्ग भरताना शिक्षकांनी सॅनिटायझरचा वापर करून प्रवेश करावा. तसेच मास्क आणि हातमोजांचा वापर करावा.
7) वर्गात तंत्रज्ञानाचा वापर करावा.
8) शाळांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करावा.
9) बसने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व बस चालकासाठीही नियमावली देण्यात आली आहे.
10) 20 पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येतील अशा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये.
11) शाळेतील मध्यान्न भोजन सकाळी 10 ते 1 वेळात विद्यार्थ्यांची गट विभागणी करून द्यावे.
12) स्वयंपाक घरातील कर्मचाऱ्यांनी आरोग्य विषयक व सर्व सुरक्षा उपायांचे पालन करावे.
13) शिकवण्यासाठी रिमोट लर्निंग, ऑनलाइन लर्निंग आणि बेल्डेड लर्निंग या पर्यायांचा वापर करावा.
14) स्वच्छतागृहात गर्दी होणार नाही असे नियंत्रण करावे.
15) स्वच्छतागृहात मुबलक पाणी, साबण, हॅण्डवॉशचा पुरवठा करण्यात यावा.
16) विद्यार्थ्यांच्या तापमानाची रोज नोंद ठेवावी.
17) शाळेत विद्यार्थ्यांचे नियमित परीक्षण व्हावे.
18) शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वच्छतेचे परीक्षण व्हावे.
हि सर्व व्यवस्था उभी करायला छोट्या शाळांना किमान 25,000 रूपये तर मोठया शाळांना एक लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. व्यावसायिक दराने भरावे लागणारे वीजबील, पाणीबील थकले असताना हा खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही.
कोरोना काळात शिक्षण आणि शिक्षणाचे नियोजन करण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरल्याचे दिसत आहे. अकरावीचे ऑनलाईन प्रवेश सुरू झालेले नाहीत, दहावी-बारावीच्या यावर्षीच्या परीक्षा कधी होणार माहित नाही, शाळा सुरू करण्याबाबत केवळ घोषणा होतात पण ठोस नियोजन नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या नावावर अध्ययन-अध्यापन अहवाल मागवले जातात पण जी मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकली नाहीत त्यासाठीचे कोणतेही नियोजन नाही.
ऑनलाइन शिक्षणाचा बागुलबुवा उभा करून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना वेठीस धरण्याची एकही संधी सोडत नाहीत.
कोरोनाचे कारण देवून अनुदानाचा टप्पा मात्र देण्याचे टाळण्यात सरकार यशस्वी ठरले आहे. प्रचलित नुसार शंभर टक्के अनुदान द्यायचं तर राहीलच पण 20 टक्के अनुदान देतानाही 18 महिन्यांचा पगार ढापण्यात सरकारने केलेली लबाडी लपून राहिलेली नाही. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ ग्रॅज्यूटीचे पैसे आणि सेवानिवृत्तीवेतनाचे कोणतेही लाभ मिळालेले नाहीत. सातव्या वेतन आयोगातील थकबाकीचा पहिला हप्ता थांबवण्यात आलेला आहे. सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन (शिक्षणसेवक) आजही केवळ सहा हजार रुपये मानधनात काम करत आहे. बक्षी कमिटीने सुचवलेली आश्वासित प्रगती योजना अद्यापि लागू झालेली नाही. 2004 पासून थांबलेली शिक्षकेतर कर्मचारी भरती सुरू झालेली नाही. बारा वर्षे व चोवीस वर्षाचे कोणतेही लाभ न घेता हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी निवृत्त होऊन गेलेले आहेत. आजही शिक्षक 27 पेक्षा जास्त अशैक्षणिक कामे करत आहेत. शिक्षकांना शाळेमध्ये शिकवू दिले जात नाही. कामाचे मूल्यमापन करण्याची मात्र वारंवार मागणी करणारे आत्ताच्या सरकारमधील आणि मागच्या सरकारमधील एकाच पकडीचे दोन दांडे आहेत.
सार्वजनिक प्रवासाची साधने सुरू झालेली नाहीत, कोरनाचे व्हॅक्सीन अजून आलेले नाही पण पन्नास टक्के शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित करण्याचा जीआर मात्र काढलाय. शाळेत मुलं नसताना शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचारी यांना बोलवायचे कारण काय? हे मात्र शिक्षण विभागाने सांगितलेलं नाही.
50% शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बाबतच्या शासन निर्णयामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे
1) शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासह सर्व प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर असावे.
2) प्रत्येक प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटायझर बसवावे.
3) शाळेत प्रवेश करण्यापूर्वी गणवेश आणि पादत्राणांचे सानिटायझेशन करावे.
4) गेटजवळ विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, यांचे नियंत्रण करावे.
5) वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे.
6) वर्ग भरताना शिक्षकांनी सॅनिटायझरचा वापर करून प्रवेश करावा. तसेच मास्क आणि हातमोजांचा वापर करावा.
7) वर्गात तंत्रज्ञानाचा वापर करावा.
8) शाळांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करावा.
9) बसने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व बस चालकासाठीही नियमावली देण्यात आली आहे.
10) 20 पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येतील अशा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये.
11) शाळेतील मध्यान्न भोजन सकाळी 10 ते 1 वेळात विद्यार्थ्यांची गट विभागणी करून द्यावे.
12) स्वयंपाक घरातील कर्मचाऱ्यांनी आरोग्य विषयक व सर्व सुरक्षा उपायांचे पालन करावे.
13) शिकवण्यासाठी रिमोट लर्निंग, ऑनलाइन लर्निंग आणि बेल्डेड लर्निंग या पर्यायांचा वापर करावा.
14) स्वच्छतागृहात गर्दी होणार नाही असे नियंत्रण करावे.
15) स्वच्छतागृहात मुबलक पाणी, साबण, हॅण्डवॉशचा पुरवठा करण्यात यावा.
16) विद्यार्थ्यांच्या तापमानाची रोज नोंद ठेवावी.
17) शाळेत विद्यार्थ्यांचे नियमित परीक्षण व्हावे.
18) शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वच्छतेचे परीक्षण व्हावे.
हि सर्व व्यवस्था उभी करायला छोट्या शाळांना किमान 25,000 रूपये तर मोठया शाळांना एक लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. व्यावसायिक दराने भरावे लागणारे वीजबील, पाणीबील थकले असताना हा खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही.
29 ऑक्टोबर 2020 चा 50 टक्के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतचा शासन निर्णय रद्द करणेबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने शिक्षणमंत्री मा. वर्षाताई यांच्याशी केलेला पत्रव्यवहार.
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कामाचे मूल्यमापन जरूर करा ...
मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पगाराबाबत नेहमीच बोललं जातं. त्यांच्या कामाच्या मूल्यमापन बाबत कोणीही उठून प्रश्न उपस्थित करतो. पण राष्ट्र घडवण्यासाठी खेड्यापाड्यांमध्ये, आदिवासी-दुर्गम भागामध्ये, डोंगरदऱ्यांमध्ये, शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये, वस्त्या वस्त्यांवर जाऊन शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवणाऱ्या शिक्षकाबद्दलचा सन्मान राजकारणीच ठेवणार नसतील तर समाजाने कोणता आदर्श समोर ठेवायचा?
शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन झालेच पाहिजे या मताचा आम्ही आदर करतो. पण त्या अगोदर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्याच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळणार आहे का? 27 पेक्षा जास्त अशैक्षणिक कामातून त्याची मुक्तता होणार आहे का? वर्षानुवर्षे न भरलेल्या रिक्त जागांवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करून अतिरिक्त ताण कमी केला जाणार आहे का? बालकांच्या शिक्षणाचा व मोफत सक्तीच्या कायद्यानुसार शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्याची भूमिका शासन निभावणार का? गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षक निर्माण करणारी अनुदानित डी.एड, बी.एड बंद झालेली कॉलेज पुन्हा सुरू करणार का? शिक्षक भरती मध्ये होणारे घोटाळे थांबून खरंच गुणवत्तेवर शिक्षक शिक्षकेतर भरती करणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर अगोदर द्यावीत आणि मग आमचे मूल्यमापन करावे. आम्ही शिक्षक त्यांच्या मूल्यमापनाला सामोरे जायला तयार आहोत.
सलाम कोविड योद्धयांना
कोरोना काळामध्ये शिक्षण विभागाने कोणतेही अधिकृत ऑनलाइन शिक्षणाचे प्रशिक्षण न देताही 50% का होईना विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शिक्षक धडपडत आहेत. ज्या ज्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था उभी होऊ शकली नाही तेथे ऑफलाइन शिक्षण देणारे शिक्षक आहेत. वस्तीवर पाड्यावर चालत जाऊन शिक्षण देणारे शिक्षक आहेत आणि हे सर्व कार्य सुरू असताना कोवीड ड्युटी करणारेही शिक्षकच आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारीच सर्वेक्षण करणारेही शिक्षकच आहेत.
सर्वांना असं वाटतं की शिक्षक घरी बसले आहेत आणि फुकटचा पगार घेत आहेत. पण हा आरोप करणाऱ्यांनी सर्वप्रथम खरी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. कोविड काळामध्ये आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांसोबत, पोलिसांसोबत अंगणवाडी सेविका सोबत खांदा लावून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम केले आहे. अनेकांना प्राणांचे बलिदान द्यावे लागले आहे. ही वस्तुस्थिती नाकारून केवळ शिक्षक या जमातीला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य केली जात असतील खपवून घेतले जाणार नाही.
कोरोना काळात काम करणारे आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन यांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत असेल तर ते शासनाचे अपयश आहे. किमान वेतन कायद्यानुसार या प्रत्येकाला किमान अठरा हजार रुपये वेतन देणे बंधनकारक असताना त्याचं आर्थिक शोषण करणाऱ्यांच्या विरोधात कोणीही बोलायला तयार नाही. पण शिक्षकांच्या पगारावर मात्र सर्व बोलतात.
अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणून तिला बदनाम करून शिक्षणाचे खाजगीकरण, व्यापारीकरण करण्याचे पुरस्कर्ते दोन्ही सरकार मध्ये बसलेले आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा या सोबत शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी जोपर्यंत शासन घेणार नाही तोपर्यंत समाजाचा, राज्याचा, देशाचा विकास होणार नाही.
करा शिक्षकांचा सन्मान! तर घडेल राष्ट्र महान!
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य
Right
ReplyDeleteअगदी बरोबर आहे, वस्तुस्थिती लक्षात न घेता वक्तव्य करणारे अनेक आहेत
Deleteशशिकांत कुलकर्णी अगदी बरोबर आहे, सर वस्तुस्थिती लक्षात न घेता वक्तव्य करणारे अनेक आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे. 🙏🙏
Deleteअगदी बरोबर आहे सर. आपल आधपतन करणारे राजकारणी मात्र एकदा निवडुन आले की, मरेपर्यत पेन्शन घेतात. सर्वच कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद आहे तर या राजकारऱ्यांचीही पेन्शन बंद करून यांनाही dcps योजना लागु केली पाहिजे. आणी वयाच्या 58 वर्ष जर हे निवडुन येत असतील तरच यांनाही अंशःता पेन्शन योजना लागु केली पाहिजे. मगच यांना इतरांच्या भावना कळतील
Deleteअगदी बरोबर आहे सर. आपल आधपतन करणारे राजकारणी मात्र एकदा निवडुन आले की, मरेपर्यत पेन्शन घेतात. सर्वच कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद आहे तर या राजकारऱ्यांचीही पेन्शन बंद करून यांनाही dcps योजना लागु केली पाहिजे. आणी वयाच्या 58 वर्ष जर हे निवडुन येत असतील तरच यांनाही अंशःता पेन्शन योजना लागु केली पाहिजे. मगच यांना इतरांच्या भावना कळतील
Deleteसडेतोड उत्तर....!
Deleteखुब छान,सरजी
Delete'पद राहील कायम, बदलणार माणसे,पदाविनाही मज कोणती,ओळखणार माणसे ?'अशी स्थिती सध्या असल्याने मिळून माणसं जगवणे शिकुया.सत्य समोर येतच असते.
Deleteअगदी बरोबर. अन्याय कारक निर्णयांचा विरोध करायलाच हवा.
Deleteकोणीही याव आणि टिकली मारुन जाव हे चालणार नाही .सडेतोड उत्तर सरजी very nice
Deleteकोणीही याव आणि टिचकी मारावी .साहेब अशीच गत शिक्षकांची आहे.
Deleteसर आपण वस्तुस्थिती मांडली आहे....Thanke
ReplyDeleteमोरे सर अतिशय समर्पक लेख
ReplyDeleteV good
ReplyDeleteअतिशय रोखठोक
ReplyDeleteअतिशय छान आणि मार्मिक शब्दात कानउघडणी
ReplyDeleteअतिशय खरमरीत भाषेत, वास्तव आणि शासनाने आपल्या बुडाखालील अंधाराला तपसणारे प्रश्न आपण उपस्थित केले आहेत सर, आपले आभार,
ReplyDeleteसमस्त शिक्षकवृंदांच्या त्यागाचं मूल्यमापन शासनाने डोळसपणे निरपेक्षवृत्तीने करायलाच हवं त्याशिवाय शिक्षकांच्या सन्मानाचे शब्द आंधळ्यांनी पाहिलेल्या हत्तीच्या कथानकाप्रमाणे ठरेल.. कोणत्याही आपत्कालीन परिस्थतीत शिक्षकाने आपले प्राण हातावर घेऊन घेतला वसा सोडलेला नाही, विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षण हक्कासाठी जागृतपणे शिक्षकांशिवाय अन्य कोणी चकार शब्द काढीत नाहीये....शासन व्यवस्थेतील धुरिणांनी अशा मूल्यमापनाची सुरुवात स्वतःपासून करावी,, शिक्षक तर सदैव तत्पर व तयारच असणार आहे..
Rokthok
ReplyDeleteजय शिक्षक भारती
ReplyDeleteशिक्षकाची बाजू मांडण्याची धमक असली पाहिजे उठ सुठ शिक्षकांना बोलल्या जाते ,जवाबदार नेते असं बोलताना दुःख वाटते
ReplyDeleteVery Nice,Sir.
ReplyDeleteVery nice sirji🙏🙏
ReplyDeleteखुप छान वाटले सर तुम्ही आपल्या भावना व्यक्त केल्या.
ReplyDeleteअतिशय छान आणि वास्तवला अनुसरुन प्रतिक्रीया अहे.एकदम रोकठोक सर .
ReplyDeleteसर
ReplyDeleteया पुढे शिक्षकांच्या विषयी बोलतांंना दहा वेळा विचार करावा लावणांरा खरमरीत.......जय शिक्षक भारती
All MLA che Evulation kara
ReplyDeleteसर
ReplyDeleteया पुढे शिक्षकांच्या विषयी बोलतांंना दहा वेळा विचार करावा लावणांरा खरमरीत.......जय शिक्षक भारती
सर
ReplyDeleteया पुढे शिक्षकांच्या विषयी बोलतांंना दहा वेळा विचार करावा लावणांरा खरमरीत.......जय शिक्षक भारती
खूपच छान ,सर.
ReplyDeleteअतिशय रोखठोक व वस्तुस्थिती मांडली सर तुम्ही.शिक्षकाबद्दल बोलताना 100वेळा विचार करतील.
ReplyDeleteखूपच सडेतोड भाषेत वास्तव मांडले सर. सलाम तुमच्या लेखनाला
Deleteवास्तव परीथितीवर सडेतोड ऊत्तर,सलाम।
Deleteस्वत: काही न करता समाजाचे आम्हीच कैवारी असा भ्रम निर्माण करणार्या अतिशहाण्यांना सडेतोड उत्तर दिलेय आपण.
DeleteVery true
ReplyDeleteKeep it up sir very nice sir
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteयोग्य भूमिका सर.
Deleteअतिशय माफक शब्दात शिक्षकांची बाजू मांडून शासन आणि प्रशासनाची उदासिनता चव्हाट्यावर आणली.
DeleteVery nice sir
ReplyDeleteजय शिक्षक भारती
ReplyDeleteसमर्पक लेख
ReplyDeleteवास्तव ...
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteखूपच छान प्रतिउत्तर दिले आहे, ह्याची गरजच होती.
ReplyDeleteप्रत्येक मुद्यांची मांडणी अगदी व्यवस्थितपणे केलेले असून शासनाला या प्रत्येकाचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल मी एक शिक्षक तुमच्यासोबत आहे
ReplyDeleteविना अनुदानित शिक्षकांची अवस्था या पेक्षा बिकट आहे.वास्तव खूप भयंकर आहे
ReplyDeleteसर,शिक्षण व्यवस्थेची पार वाट लावली आहे.आमदार,खासदार व मंत्रालयीन सचिव यांनी.
ReplyDeleteअतिशय मुद्देसूद लेख!
ReplyDeleteखुप छान उत्तर
ReplyDeleteआपल्या व्यथांची सुंदर कथा मांडणी
ReplyDeleteThank you sir 🙏
ReplyDeleteशिक्षकांची आजची वस्तुस्थिती तंतोतंत मांडली आहे .धन्यवाद सर🙏
ReplyDeleteअतिशय समर्पक व प्रभावी मत आपण मांडले आहे - कल्पेश पिंपळे सर
ReplyDeleteअतिशय उचित उत्तर दिलात सर, खूप खूप धन्यवाद
ReplyDeleteसर , मनापासून धन्यवाद .
ReplyDeleteआपल्या व्यथा मांडल्याबद्दल
अगदी बरोबर मोरे सर..छान..शिक्षणाच्या हक्कासाठी..शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती..जय हो..
ReplyDeleteखरोखरच ,सत्य, वास्तव आणि कटू सत्य मांडले सर. शिक्षकांची कामे, त्यांच्यावर होणारे अन्याय विनाअनुदानित शिक्षकांचा तुटपुंजा पगार त्यांची होणारी ससेहोलपट सरकारला दिसत नाही. कोरोना च्या स्तिथीत सर्व सोयी, सुविधा असल्याशिवाय ,विद्यार्थी असल्याशिवाय शाळा सुरू करणे धोक्याचे आहे
Deleteजिन्दाबाद सर, बिनकामाचे लोकप्रतिनिधी शिक्षकांबद्दल बेताल वक्तव्ये करून स्वताच्या अल्प बुध्दीचा परिचय देत आहेत. यानिमित्ताने मागील सरकार व सध्याचे सरकार यांची शैक्षणिक धोरणं किती केविलवानी आणि अन्यायकारक आहेत याचा योग्य परामर्श केल्याबद्दल आपले अभिनंदन सर. जय शिक्षक भारती. जिन्दाबाद सर..
ReplyDeleteमोरे सर खुपच छान मुद्दे मांडले आपण 👍. कपिल पाटील सरांनी पत्र व्यवहार केलेलाच आहे. पण तुम्ही म्हणल्या प्रमाणे मागचे सरकार काय किंवा आताचे काय... एकाच पकडीचे दोन दांडे आहेत. शिक्षण खात्याची वाताहात करण्याचे यांनी ठरवलेलेच आहे.
ReplyDeleteत्यात आता लोकप्रतिनिधी पण शिक्षकां प्रति सन्मान दाखवत नाहीत. यांच्या संपत्तीचे आणि पगार/पेन्शनचे मुल्यमापन होणे गरजेचे आहे.
मूल्यमापन झालेच पाहिजे.
DeleteKhupach chaan sir. Aamachya shikshakanchya manatil sarvach prashna mandale aahet.
Deleteत्या bjp चे लोकप्रतिनिधी चे काम किती आहे याची चौकशी लावा.
ReplyDeletecongrates sirji
ReplyDeleteत्या bjp चे लोकप्रतिनिधी चे काम किती आहे याची चौकशी लावा.
ReplyDeleteअगदी समपर्क उत्तर,मुद्देसूद मांडणी.आमदार, खासदार व मंत्रालयीन अधिकारी,सचिव यांनी शिक्षणाचा खेळ करून ठेवला आहे.शिक्षकांचा(गुरू)आदर करा अन्यथा विनाश जवळ आहे. सांगा या बिनडोक सरकारला कुणीतरी.
ReplyDeleteआश्रम शाळेची अवस्था तर याहून बिकट आहे. शिकणे,खाणे,राहणे,झोपणे व बाकी इतर सर्व कामे तिथेच. एकाला काही झाले की संपूर्ण शाळा कुलूपबंद. आणि जबाबदार मात्र...... अधिक्षक.
Politician should evaluate themselves first.
ReplyDeleteSir you hv well explained and proper points.we are with you
Thanks
हे विनय नातू असोत अथवा विनोद तावडे,
ReplyDeleteबुद्धी आहे तशीच आहे. त्यात फरक नाही पडायचा. कदाचित भारतीय जनता पार्टी च्या या महाशयांना शाळा, शिक्षण शिक्षक आणि शैक्षणिक वातावरण या बद्दल ना माहिती आहे ना रस. शिक्षकांच्या पगारावर लक्ष असणारे जे महाभाग आहेत-त्यांचे दर्शन फेसबुक च्या कॉमेन्ट मध्ये होतेच-त्यातलेच हे पण आहेत बस.
बाकी कपिल पाटील साहेब, आपल्या कर्तृत्वाचा डंका चहू बाजूला आहे हीच समाधानाची बाब. धन्यवाद
हे विनय नातू असोत अथवा विनोद तावडे,
ReplyDeleteबुद्धी आहे तशीच आहे. त्यात फरक नाही पडायचा. कदाचित भारतीय जनता पार्टी च्या या महाशयांना शाळा, शिक्षण शिक्षक आणि शैक्षणिक वातावरण या बद्दल ना माहिती आहे ना रस. शिक्षकांच्या पगारावर लक्ष असणारे जे महाभाग आहेत-त्यांचे दर्शन फेसबुक च्या कॉमेन्ट मध्ये होतेच-त्यातलेच हे पण आहेत बस.
बाकी कपिल पाटील साहेब, आपल्या कर्तृत्वाचा डंका चहू बाजूला आहे हीच समाधानाची बाब. धन्यवाद
सणसणीत उत्तर
ReplyDeleteखूपच जबरदस्त शिक्षक व शिक्षण यांना समजण्यासाठी गरजेचे आहे
ReplyDeleteमोरे सरांनी साल काढलीत ती बार केलं, अशी पण याची चामडी जड झाली आहे, कसलईच संवेदना शिल्लक राहिली नाही यांच्या कडे.
ReplyDeleteछान कान उघडणी केली आहे.उत्तम
ReplyDeleteअतिशय समर्पक आणि वास्तव चित्र रेखाटणारा लेख, धन्यवाद सर
ReplyDeleteसरजी, वास्तव मांडले.
ReplyDeleteखूपच छान लेख सर
ReplyDeleteसर खूप आभार!
ReplyDeleteशिक्षकांची व्यथा आणि परिस्थिती जाणून घेऊन योग्य मांडले.
खूप वास्तववादी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करणारी आपली लेखणी आहे सर, खूप खूप धन्यवाद 🙏
ReplyDeleteअगदी योग्य शब्दात उत्तर. आपले आभार सर!
ReplyDeleteसुभाष माेरे सर, अतिशय वास्तव परीस्थितीचे वर्णन केले आहे.सामान्य जनतेला शिक्षकांचे कार्याविषयी काहीच घेणे देणे नाही कारण त्यांचे काम शिक्षकांविषयी अडतच नाही.
ReplyDeleteJai shilshak Bharthi
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteसरजी, वास्तव मांडले
ReplyDeleteअगदी वास्तव परिस्थिती मांडली.
ReplyDeleteThis is real fact sir
ReplyDeleteशिक्षकांचे मूल्यमापन करणार कोण हे सारेच अंगठेबहादूर ,लाळघोटे आपणास याबद्दल खूपच माहिती असेल असो शिक्षकांचे दुःख मांडणारा नेता तरी सापडला
ReplyDeleteअगदी योग्य शब्दात म्हणणे मांडलेत सर 👍
ReplyDeleteReal Sirji
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteमोरे सर छान समाचार घेतलात आपण. पण या चोट्ट्यांना काही फरक पडत नाही. काविळीने ग्रस्त अशा यांना शिक्षकांचे कार्य दिसणारे नाही.
ReplyDeleteवास्तव व अप्रतिम प्रतिक्रिया सर...
ReplyDeleteवास्तव व अप्रतिम प्रतिक्रिया सर...
ReplyDelete
ReplyDeleteअगदी योग्य शब्दात म्हणणे मांडलेत सर👌👌👌👌👌👌
साहेब खरंच परीपुर्ण असे उत्तर दिलं आहात.फक्त कोवीड १९ नाही तर कोणत्याही परिस्थितीत देशावर आली तर सर्व प्रथम प्रत्येक विभागाला शिक्षकांची आठवण येते. निसर्ग चक्रीवादळात सुध्दा तलाठ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.या सर्व गोष्टींचा विसर आपल्या राज्य कर्त्यानां पडला आहे असे वाटते.....
ReplyDeleteश्री.मुबीन बामणे सर सचिव शिक्षक भारती उर्दू महाराष्ट्र राज्य
ReplyDeletevery nice sir
ReplyDeleteशिक्षक आणि शिक्षण क्षेत्राची अवमानना कुठे तरी थांबलीच पाहिजे
ReplyDeleteखूप छान सर
खरच अतिशय मार्मिक आणि सत्य मत माननीय सुभाष सरांनी मांडले आहे.शिक्षक कामासाठी केव्हाच नाही म्हणत नाहीत आणि म्हणणार हि नाहीत कारण त्यांना ती मुभाच त्यांना दिली जात नाही.शिक्षक शाळेत येण्यासाठी नकार देत नाहीच पण विद्यार्थी शाळेत नाहीत तर येवून करणार काय त्यापेक्षा घरी राहून विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिकविण्याची तयारी तरी करू शकतील.त्याशिवाय येण्या जाण्याच्या प्रवासात शिक्षकांना असणारा धोका सुद्धा टळेल.एकेकाळी शिक्षकांना देव मानणारा समाज होता आणि आज शिक्षकांना वेठबिगार समजणारी राजकीय व्यवस्था आणि परिणामी समाज निर्माण झाला आहे.याचा धोका लोकांना आज कळणार नाही पण भविष्यात घडणारे नागरिक ,स्वतःची मुले जेव्हा बुद्धिमान असून सुद्धा व्यवहारिक वागतील तेव्हा लोकांना शिक्षकांची किंमत कळेल.कारण तेव्हा शिकविणारा शिक्षक सुद्धा याच व्यवस्थेतून घडलेला असेल,तर तो विद्यार्थ्यांना बौद्धिक ज्ञानापलिकडे जाऊन संस्कार देवू शकणार आहे का? देश भले आधुनिकतेकडे झुकलेला असेल पण माणुसकीला मुकलेला असेल.पुन्हा एकदा सुभाष सराना खूप खूप धनयवाद की त्यांनी शिक्षकांच्या वतीने हे लोकांसमोर आणले आणि परखडपणे बाजू मांडली.
ReplyDeleteअगदी बरोबर
ReplyDeleteअगदी बरोबर मोरे सर
ReplyDeleteआम्ही आपल्या सोबतच आहोत
शिक्षकांच्या समस्या समाज व शासनासमोर अगदी परखडपणे मांडलेले आहेत. त्याबद्दल सुभाष सरांचे आभार.
ReplyDeleteअगदी बरोबर आहे सर .
ReplyDeleteIn writing..show the true picture
ReplyDeleteवस्तुस्थिती मांडली सर
ReplyDeleteबरोबर आहे मोरे सर
ReplyDeleteमूल्यमापन करणे याचे ज्ञान कोणी दिले याचे उत्तर मागता येईल
एकदम बरोबर सर...
ReplyDeleteNice Sir 👍
ReplyDeleteGreat More sir.
ReplyDeleteयाला एकच उत्तर २००५ नंतर आमदार झालेल्यांची पेंशन बंद बस
ReplyDeleteशिक्षकांची बाजू योग्य पद्धतीने मांडल्याबद्दल धन्यवाद. या सर्व कामा सोबत राज्यातील आश्रम शाळेतील शिक्षकांना खावटी अनुदानाच्या सर्व्हेक्षणावचे कामही दिले गेले.पण आजतागायत तीन महिन्यापासून वेतनही दिले गेले नाही.सातव्या वेतनाचा पहिला हप्ता व अन्यायकारी डी सी पी एस चा पहिला हप्ताही रोखीने मिळाला नाही.
ReplyDeleteखुब छान सरजी,
ReplyDeleteकल्याणकारी राज्याची संकल्पना समजून देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.
ReplyDeleteअत्यंत योग्य शब्दात साऱ्या शिक्षकांच्या भावना आपण व्यक्त केल्या सरजी...👌👌👍
ReplyDeleteThis is a real fact sir.
ReplyDeleteबरोबर आहे सर्वांना फक्त पगार दिसतो . त्रास दिसत नाही . विदयार्थी घडविणे व त्यांच्यात मूल्ये रुजवणे एवढे सोपे नाही . शिक्षकाच्या कामाची तुलना पैशात होऊच शकत नाही मात्र दुर्देवाने समाजाला आणि राजकारण्यांना फक्त आर्थिक गणित जुळवण्यातच धन्यता वाटत आहे .
ReplyDeleteसत्य परिस्थिती
ReplyDeleteस्पष्ट व सडेतोड 👌👍
ReplyDeleteपण यांना जाग कधी येणार ?
ReplyDeleteअगदी खर सर
ReplyDeleteराजकारणी लोकांना शिक्षकांनी कायम दूर ठेवले पाहिजे
ReplyDeleteत्या वेळेस त्यांना आपली किंमत कळेल पण असे होत
नाही आपली काही लोक ते सोबत घेतात व माहिती घेऊन
आपल्या विरोधात त्याचा वापर करतात कारण समाजात आपल्या सारखा स्वच्छ पेशा कोणताच नाही आपले कोणत्या
आमदार किंवा खासदाराकडे आपले काम नसते हे लक्षात
घेणे गरजेचे आहे
अगदी सत्य परिस्थितीमांडली आहे.
ReplyDeleteअगदी योग्य आहे.
ReplyDeleteखूप छान सर
ReplyDeleteमा. मोरे सर,
ReplyDeleteसादर प्रणाम.
सर, तुमच्या अभ्यासपूर्वक विचारांशी समस्त शिक्षक सहमत असतील यात शंका नाही. शिक्षकाचा सन्मान करण्यासाठी मनाचा मोठेपणा व औदार्य लागते यांच्यामाते, शिक्षक म्हणजे यांचा सालगडी आहे...वाटेल तिथे वापर करुन घ्यायचा निवडणूक काय, जनगणना काय, वनमहोत्सव, चेक पोस्ट. सर्वेक्षण, आपत्तिव्यवस्थापन वगैरे वगैरे त्यात ऑनलाइन, ऑफलाईन, प्रशिक्षण, ही माहिती दे ती माहिती दे....सारा तुघलकी कारभार चालू आहे. जाशी काय यांची मालमत्ता आहे पगार देतात म्हणजे यांच्या खिशातूनच देतात. रोज नवीन GR काय काढतात....सगळा बट्ट्याबोळ !! 15 वर्ष यांना DCPS चा साधा हिशोब देता येत नाही याला काय म्हणायचे...केवळ निश्क्रियता!! गेली 15 वर्ष हक्काच्या पेन्शन साठी आपण लढा देतोय कित्येक बांधव मेले त्यांची कुटुंब उघड्यावर आली मात्र ह्या निडरांना दया नाही आली....त्यांनी मात्र त्यांचे भत्ते काय वाढवले...मानधन काय वाढवले....पेन्शन काय..काहींना म्हने दोन दोन पेन्शन??? मुळात पेन्शन ही पगारी कर्मचारी यांना आसते..मानधनावर काम करनारया समाज्सेवकांना पेन्शन नसतेच. हे DCPS द्यायच्या सुद्धा पात्रतेच्या नाहीत. प्रत्येक शिक्षक हा उच्च शिक्षित आहे यांच्या सारखा आंगठे बहाद्दूर नाही...त्यामूळे शिक्षकांच्या बद्दल असे वक्तव्य करणे म्हणजे आपलीच अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा निर्बूद्ध प्रकार दुसरे काय.....यासाठी सर्वांनी संघटीत होऊन यांना जाब विचारायला पाहिजे...मला वाटते ते आपल्या स्थायी स्वभावाचा गैरफायदा घेतात...ही का लोकशाही ??
खरे तर आपण अगदी वस्तविकतेला धरुन कानउघडनी केली आहे....सलाम !!!
Absolutely correct sirji keep going
ReplyDeleteखूप छान लेख सर .
ReplyDeleteअगदी बरोबर
ReplyDeleteSir अतिशय परखडपणे आपण आपले विचार मांडले आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन लोकप्रतिनिधी किंवा राजकारणी लोक केवळ पाच वर्षासाठी सत्तेवर येतात व आपल्या मनमानी स्वभावानुसार शिक्षकांवर ताशेरे उडतात शिक्षकाचे समाजातील स्थान काय आहे याचे प्रशिक्षण देण्याची गरज खरंच आता आहे असे वाटते करुणा च्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षकांनी तंत्रस्नेही असून नसून देखील ऑनलाइन टिचिंग चे काम केले आहे करीत आहेत तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा करिता अहोरात्र शिक्षक झटत आहे केवळ शिक्षकांच्या पगारावर डोळा ठेवून आपलं मात्र झाकत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे शिक्षकांवर खुलेआम ताशेरे ओढणे थांबले पाहिजेत तुलना करणे बंद झाले पाहिजे असे मला वाटते पुन्हा एकदा आपले अभिनंदन
ReplyDeleteखूप छान लेख शिक्षकांच्या कामाबद्दल अतिशय तळमळीने भावना व्यक्त केल्या आहेत शिक्षकांच्या इतर कामांचे मोजमाप कुठेही केले जात नाही याची जाणीव करून दिली
ReplyDeleteCorrect sir
ReplyDeleteसंजय पाटील सर इंदापूर
ReplyDeleteअगदी बरोबर सर 50/उपस्थितीचा आदेश रद्द झालाच पाहिजे.
अप्रतिम,अभ्यास पूर्ण लेखन मोरे सर जय शिक्षक भारती लढू या जिंकू या...!
ReplyDeleteyou are right sir.
ReplyDeleteआदरणीय मोरे सर,
ReplyDeleteअसल्या कमी बुद्धीच्या लोकांना अशीच सणसणीत चपराक दिली गेली पाहिजे. अतिशय प्रभावी लेखन केलेत आपण.
मला एक प्रश्न राजकारण्यांच्या बाबतीत नेहमीच पडतो, राजकारण ही समाजसेवा आहे तर मग पगार आणि निवृत्तीवेतन कशासाठी? आणि जर का राजकारण ही नोकरी आहे तर तिथे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता का नाही?
Very nice your message to MLA
ReplyDeleteआजरोजी शिक्षकांच्या समस्या व अडचणी यांना वाचा फोडणारी एकमेव संघटना म्हणजे शिक्षक भारती ...!
ReplyDeleteसंघटना मजबूत करण्यासाठी आपण व्यवसाय बंधूंनी एकत्रित येवून मा . कपिल पाटील , साहेबांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे .
( हे माझे व्यक्तिगत मत आहे . कोणीही विपर्यास करू नये . )
वास्तव स्थिती मांडण्याचे कार्य केलात आपण अगदी बरोबर वस्तुस्थिती मांडली सर..
ReplyDeleteवास्तवदर्शी प्रतिक्रिया प्रत्येकाच्या मनात खदखदणारी सलं आपण पूर्ण केलीत
ReplyDeleteअगदी बरोबर आहे सर.ज्यांना शिकता आले नाही म्हणून राजकारणात गेले अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार?
ReplyDeleteअगदी बरोबर आहे सर.ज्यांना शिकता आले नाही म्हणून राजकारणात गेले अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार?
ReplyDeleteअगदी बरोबर आहे सर.ज्यांना शिकता आले नाही म्हणून राजकारणात गेले अशा लोकांकडून काय अपेक्षा करणार?
ReplyDeleteसुभाष मोरे सर आपण वस्ततुस्थिती मांडली आहे याचा सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे .
ReplyDeleteखूपच सुंदर सर !आता तरी प्रशासनाला जाग येईल का ? झोपलेले जागे करता येतात पण सोंग घेतलेलं सरकार कधी जागे होईल ? अनेक सरकार येतील जातील पण शिक्षकांचे प्रश्न तसेच आहेत . सर्व संघटना एकत्र एऊन लढा दिला पाहिजे .
ReplyDeleteम्हणात ना! जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!
ReplyDeleteमोरे सर
आपण कडक भाषेत , समर्पक शब्दात वास्तव चित्र उभं केलं आहे.
Right n it's a reality👍
ReplyDeleteजबरदस्त! शिक्षकांच्या पगारावर डोळा असणाऱ्यांना सडेतोड उत्तर.
ReplyDeleteधन्यवाद सुभाषजी.
5 वर्षे लोकसेवक म्हणून निवडून येणार आणि मरेपर्यत पेन्शन खाणाऱ्या लोकांना शिक्षकांचा पगार काढण्याचा काहीही अधिकार नाही आणि इतकाच काय मुंगळा उठला असेल तर स्वतःची पेन्शन सरेंडर करावी आणि गप्प बसावी
ReplyDeleteआणि त्यावरही मनाचं समाधान होत असेल तर स्वतःची सर्व मालमत्ता विकावी आणि जे शिक्षक गेली 15 वर्षपासून विनावेतन काम करत आहेत त्यांच्यासाठी ते पैसे खर्च करावे
किंवा सरकारी एक रुपयाही न घेता 10 जगून दाखवावं
5 वर्षे लोकसेवक म्हणून निवडून येणार आणि मरेपर्यत पेन्शन खाणाऱ्या लोकांना शिक्षकांचा पगार काढण्याचा काहीही अधिकार नाही आणि इतकाच काय मुंगळा उठला असेल तर स्वतःची पेन्शन सरेंडर करावी आणि गप्प बसावी
ReplyDeleteआणि त्यावरही मनाचं समाधान होत असेल तर स्वतःची सर्व मालमत्ता विकावी आणि जे शिक्षक गेली 15 वर्षपासून विनावेतन काम करत आहेत त्यांच्यासाठी ते पैसे खर्च करावे
किंवा सरकारी एक रुपयाही न घेता 10 जगून दाखवावं
एकदम बरोबर आहे, आपल्या वेदना आपल्यालाच ठाऊक, ते तिरॖ्हाईत कसं ठरवणार, पण खूप छान मांडला आहे सर तुम्ही हा विषय
ReplyDelete
ReplyDeleteखूपच सुंदर सर ! वास्तव स्थिती मांडण्याचे कार्य केलात आपण अगदी बरोबर वस्तुस्थिती मांडली सर धन्यवाद!
अगदी बरोबर.......
ReplyDeleteअगदी बरोबर आहे सर, ईंट का जवाब पत्थर से।
ReplyDeleteमनापासून सलाम सर. खूपच छान
ReplyDeleteVery true more sir. You raised very valid points
ReplyDeleteआव्हानात्मक भविष्याचे प्रश्न सोडवण्या ऐवजी आज शिक्षकांवर अशी वेळ यावी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. युवा पिढीला आपल्या आदर्श शिक्षकांची ही अशी आणीबाणी झालेली पाहता स्वतः शिक्षक व्हावं असं अजिबात वाटताना दिसून येत नाहीये. वरील मांडलेले प्रश अगदी योग्य आहेत आणि मुळात शिक्षण-विद्यार्थी यांना जोडणारी कडी जर तुटली तर समाजात बौद्धिक पातळीवर दोन स्तर तयार होतील. " #राजा के बेटा ही राजा बनेगा". शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा स्पर्धात्मक कठीण काळ हा ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कधीच न संपणारा असेल.
ReplyDeleteअभिमान आहे अशा शिक्षकांचा जे या परिस्थितीतही स्वतः एक नेतृत्व घेऊन अनेक शिक्षकांचा आवाज होत आहेत, कर्तव्य निभावत आहेत.
रोखठोक, वास्तवता दर्शविणारा, अभ्यासपूर्ण लेख... 👍👍💐💐💐🙏
ReplyDeleteसर्व शिक्षक बांधवांनी एकत्रित येऊन वेगवेगळ्या मुद्द्यांना अनुसरून या असल्या राजकारणी नेते आमदार खासदार यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केल्या पाहिजे किमान 10 शिक्षक मिळून 1 मुद्दा अशापद्धतीने सगळे खंडपीठ, जिल्हा सत्र न्यायालये उच्च न्यायालये येथे हजारो याचिका दाखल झाल्या तर ह्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही आणि हे करत असताना अपल्यातलेच जे काही या राजकारण्यांचे चमचे आहेत त्यांनाही त्यांची जागा दाखवावी लागणार आहे.
ReplyDeleteसर्व शिक्षक बांधवांनी एकत्रित येऊन वेगवेगळ्या मुद्द्यांना अनुसरून या असल्या राजकारणी नेते आमदार खासदार यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केल्या पाहिजे किमान 10 शिक्षक मिळून 1 मुद्दा अशापद्धतीने सगळे खंडपीठ, जिल्हा सत्र न्यायालये उच्च न्यायालये येथे हजारो याचिका दाखल झाल्या तर ह्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही आणि हे करत असताना अपल्यातलेच जे काही या राजकारण्यांचे चमचे आहेत त्यांनाही त्यांची जागा दाखवावी लागणार आहे.
ReplyDeleteकोणीही उठतय आणि शिक्षकाबाबत गरळ ओकतय.असल्या राजकारणी मानसिकतेचा संघटनेच्या माध्यमातून समाचार घेतलाच पाहिजे.
ReplyDeleteसमर्पक आणि वास्तव चित्रण केले आहे सर.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteExcellent sir 👍👍
ReplyDeleteExcellent sir
ReplyDeleteरोखठोक उत्तर
ReplyDeleteकुठलंही विचार न करता केलेले वक्तव्य आहे
ReplyDelete.
सरजी योग्य व रोकठोक भूमिका
ReplyDeleteखरंच छान उत्तर
ReplyDeleteसर यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करायला पाहिजे मग नंतर दुसऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याची गोष्ट करावी
ReplyDeleteThank you for making people aware of the injustice being done to the students and teachers. God bless you 🙏
ReplyDeleteसर,उत्कृष्ट वक्तव्य..... फारच छान..
ReplyDeleteअगदी बरोबर आहे
ReplyDeleteसरकारला ५ वर्षासाठी निवडून येणारे आमदार व मंत्र्याना जुनी पेंशन देता येते पण आपला पूर्ण जीवन शिक्षक म्हणून सेवा करणाऱ्या साठी जुनी पेंशन देता येत नाही.
शिक्षकांच्या समस्या मांडल्या त्याबाबत सरांचे आभार...
ReplyDeleteअगदी बरोबर आहे सर
ReplyDeleteAjita Ajit Lanjekar. S.E.C DAY SCHOOL (santacruz)
ReplyDeleteVery true Mr.More sirji ,Nice your m,essage to MlA. You raised very valid points
सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केलेल्या सुचनेनुसार प्राथमिक शिक्षकांचे वेतन इतर कोणत्याही शिक्षकांपेक्षा जास्त असावे निर्देशित केले आहे.सत्य परिस्थिती ही जो पगार मिळतो तो देखील कधीच वेळेवर मिळत नाही.आणि हे आपला पगार काढणार??? तुम्ही अगदी बरोबर आहात.सर
ReplyDeleteअति सुंदर व विचारप्रधन लेख आहे, सर.
ReplyDeleteWriting very well
ReplyDeleteराज्यातील सर्वात मोठी कर्मचारी संख्या म्हणजे शिक्षक
पण शंभर संघटनेच्या रुपाने विभागलेली ताकत एकजुट झाल्या शिवाय कोणालाच दिसणार नाही
मी अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सचिव या वादात सामान्य शिक्षक संपनार आहे
छान व योग्य मांडणी.
ReplyDeleteअगदी बरोबर आहे सर, छान.
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteKhupach chhan lekh sir agdi yogya Uttar dile ahe. apan nehmi shikhakanchya bajune khambirpane lihita hatts off to you and hatts off to shikshak Bharti 🙏
ReplyDeleteअगदी बरोबर आहे सर तुमचे आभार
ReplyDeleteअगदी सडेतोड उत्तर दिले सर आज याची गरज होती.
ReplyDeleteशिक्षक हा सेवा करतो . कितीतरी वर्षे तुटपुंज्या पगारावर मास्तर गुजराण करायचे. आपल्या संघटनेमुळे शिक्षकांना चांगले दिवस आले. पगार वाढले पण कामेही वाढली. अशैक्षणिक कामेही लागली. तेव्हा का नातू बोलले नाहीत?
ReplyDeleteमोरेसर खूप छान कानउघाडणी केली आहे. 👌
कल्पना शेंडे
अध्यक्ष, मुंबई
शिक्षक भारती.
The Best Casinos Near Pittsburgh, PA | Mapyro
ReplyDeleteDiscover the best casino and 서귀포 출장샵 play poker games near Pittsburgh, PA. From a gaming 원주 출장안마 table 여주 출장마사지 to the casino floor, you'll find 대전광역 출장마사지 all the games in 상주 출장샵