शिक्षण सचिवांना हटवा, शिक्षक भारतीची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
दि. २१ एप्रिल २०२१ -
गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे व बेपर्वाईमुळे राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार उशिरा होत आहेत. गुढी पाडवा सण गेला, आज राम नवमी आहे. आणि रमजानचा पवित्र महिनाही सुरु झालेला आहे. महिन्याची २० तारीख उलटून गेली तरी अद्याप पगार झालेले नाहीत. शिक्षण विभाग आणि वित्त विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने पैसे येऊनही वित्त विभागाने बिलं नाकारली आहेत. याबाबतीत शिक्षण संचालकांनी पत्र लिहलेले आहे. परंतु अदयाप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.
मागील महिन्यातही असाच प्रकार झाल्याचं उघडकीस आलं. शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे वेळेत पैसे न मागितल्यामुळे पगार उशिरा झाले होते. आमदार कपिल पाटील यांनी वित्त सचिवांना भेटून हा प्रकार समोर आणला होता. त्यानंतर हालचाली होऊन फेब्रुवारीचे पगार झाले. तरी सुद्धा अद्यापही काही जिल्ह्यात फेब्रुवारीचे पगार झालेले नाहीत.
मार्च पेड इन एप्रिल पगार न होण्यासाठी अनेक तांत्रिक बाबी सांगितल्या जात आहेत. मात्र या सर्वांचा फटका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसत आहे. कोविड काळात अनेक ठिकाणी शिक्षक, शिक्षकेतरांचे मृत्यू झालेले आहेत. अनेकजण कोविडग्रस्त असून उपचारासाठी मोठा खर्च होत आहे. कर्जाचे हफ्ते थकलेत. दंड, व्याज भरावे लागत आहे. आणि या सगळया परिस्थितीत शिक्षण विभाग मूग गिळून बसलेला आहे. आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण विभागातल्या या दिरंगाईवर आणि शिक्षण विभागातले अधिकारी काम करत नाहीत, याबद्दल आवाज उठवला. तेव्हा काम करायचं राहिलं बाजूला पण शिक्षण सचिवांनी विधान परिषदेच्या सभापतींकडेच आमदार कपिल पाटील शिक्षकांच्या हिताच्या निर्णयांसाठी दबाब टाकतात, अशी तक्रार केली आहे. अशा प्रकारची वागणूक करणाऱ्या शिक्षण सचिवांनाच हटवा अशी मागणी शिक्षक भारतीने आज केली आहे.
मुंबईतील शिक्षकांच्या पगाराबाबत सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच निर्णय दिलेला आहे. परंतु शिक्षक भारतीने याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षण विभागाकडून त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे युनियन बँक ऑफ इंडियाला निधी वितरणाची अडचण येत आहे. यासर्व प्रश्नांबाबत उद्या आमदार कपिल पाटील उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांना भेटून सर्व परिस्थिती सांगणार आहेत, अशी माहिती मोरे यांनी दिली.
Rt decision sir.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteअगदी बरोबर सर..लढेंगे जितेंगे..जय शिक्षक भारती.
ReplyDeleteनागपूर जिल्ह्यात पण अजूनपर्यंत मार्च चे वेतन झाले नाही सर.🙏
ReplyDeleteमार्च2020ते आजपर्यंत आमचे13 महिन्याचे वेतन झालेले नाही सर, शिवनेर विद्यामंदिर, साकीनाका, घाटकोपर,
DeleteRatnagiri che payment aale nahi sir
ReplyDeleteनाशिकचेही नाही आलेत अजून
Deleteशिक्षक भारती नेहमीच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असते., धन्यवाद मान.आ.कपिल पाटील साहेब व सन्मा. सुभाष मोरेसर व इतर सर्व पदाधिकारी.🙏🏻
ReplyDeleteठाणे जिल्ह्यातही TDCC व TJSB बँकेने शिक्षकांचे मार्च-2021 वेतन दि.9 व दि.12 एप्रिल 2021 रोजीगुढीपाडव्या निमित्त केलेत.
ReplyDeleteजिल्हा परिषद शिक्षकांचे बाकी आहेत साहेब ठाणे जिल्हयात
Deleteशिक्षक भारतीचे बहुमोल कार्य . असेच कार्य पुढे सुद्धा होत राहील धन्यवाद .
ReplyDeleteअजून पर्यंत गडचिरोली जिल्हयाचे शिक्षकाचे वेतन झाले नाही
ReplyDeleteसंपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींचे पगार एकट्या शिक्षण सचिव बाईंमुळे रखडले आहेत, निषेध
ReplyDeleteअहमदनगरचे पण नाही
ReplyDeleteसर विभाग सचिव आणि मंत्री आपापल्या विभागासाठी जागरूक असतात, शिक्षण विभागालाच सुरुवातीपासून काही तरी रोग असल्यासारखा वागतात, 7 वेतन आयोग बाबतीत पण हेच झालं,
ReplyDeleteवित्त विभाग आणि शिक्षण विभाग यांच्यात गेली अनेक वर्ष समन्वयाचा अभाव दिसून आला आहे. त्यामुळे अनेक वर्ष हा म्हणजे पगाराचा प्रश्न उदभवतो आहे. आपण हा प्रश्न कायम स्वरुप निकाली काढावा. त्याकरिता आपण योग्य पावले उचली आहेत. धन्यवाद। सौ.मनिषा काळे.
ReplyDeleteसर औरंगाबाद जिल्ह्यात देखील मार्च महिन्याचे पगार अद्याप झालेले नाहीत
ReplyDeleteआमच्या जळगाव जिल्ह्यात नेहमीची रडकथा आहे. कधीच पगार वेळेवर होत नाही.
ReplyDeleteसर पाटील साहेबाना उद्याच्या मिटिंगमध्ये शिक्षणसेवक मानधनवाढीचा मुद्दा पण उपस्थित करायला लावा ही नम्र विनंती 🙏🙏🙏
ReplyDeleteसर जी शालेय शिक्षण विभाग आणि वित्तविभागालामार्च 2022 पर्यंत तरतूद करायला लावा
ReplyDeleteदरमहा वेतन Cmp नेच होणे गरजेचे आहे. राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये cmp प्रणाली सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणे करण्यात यावा.
ReplyDeleteयोग्य मागणी
DeleteShikshan sachiv satat shikshakanna davchat astat tyanna हटवायला pahije .
ReplyDeleteCmp द्वारे होणे गरजेचे आहे प्रणाली द्वारे जिल्ह्यांमध्ये वेतन होणे गरजेचे आहे आहे पाटील साहेब वस्तीशाळा शिक्षकांची सेवा सातत्य धरणे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे साहेब
ReplyDeleteगेले काही महिने सेवा निव्रुत्त शिक्षक, जि प.कर्मचारी यांचे
ReplyDeleteपेन्शन २०/२५तारखेला होतात.एकल असलेल्या पेन्शनर लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. तरी विद्यमान
कर्मचाऱ्यांनी आपली कामे वेळेवर करावी.
शिक्षण सचिव शिक्षकांचे प्रश्न सोडू शकत नसतील तर, असे शिक्षण सचिव काय कामाचे? आशा शिक्षण सचिवांना हटविलेच पाहिजे.
ReplyDeleteलढेंगे, जितेंगे.
जय शिक्षक भरती
Dcpsधारक शिक्षकांचे हप्ते अजूनही दिलेले नाहीत
ReplyDeleteइतर विभागांचे वेतन वेळेवर तर शिक्षण विभागाबाबत असे का?आम्ही आपल्या सोबत आहोत.... पिंपळे सर
ReplyDeleteइतर विभागांचे वेतन वेळेवर तर शिक्षण विभागाबाबत असे का?आम्ही आपल्या सोबत आहोत.... पिंपळे सर
ReplyDeleteसुप्रीम कोर्टाने आदेश देऊनसुद्धा पगार होत नसतील तर कायद्याची पायमल्ली होत आहे,कायदा कुचकामी ठरतो आहे या कायद्यामध्ये सचिव ,वित्तविभागाचे सर्व अधिकार यांना या कायद्यामध्ये शिक्षेची तरतुद नाही यामुळे पगार वेळेवर झाला काय आणि नाही झाला काय त्यांना काही फरक पडत नाही.आधी कायदे खडक झाले पाहिजेत की शिक्षा व दंडाची तरतूद हवी..
ReplyDeleteबरोबर सर
DeleteGood job Saheb
Deleteअगदी बरोबर, पगार दिरंगाईमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत,त्यासाठी अधीकारी वर्गाने वेळ पाळणे,दिरंगाई टाळणे गरजेचे आहे
ReplyDeleteशिक्षक भारती व आदरणिय कपील पाटील साहेब नेहमिच शिक्षकांच्या हितासाठी संघर्ष करतात.
ReplyDeleteजय शिक्षक भारती
रायगड जिल्ह्याचे ही पगार झालेले नाहीत
ReplyDeleteBarobar sir Akola jilyache pan Marche payment zale nahi
ReplyDeleteright patil sir
ReplyDeletekapil patir great work
ReplyDeleteRatnagiri kahi shalanche February che pagarhi jhalele nahit adyap
ReplyDeleteमुद्दा केवळ पगाराचा नाही, शिक्षण आणि शिक्षकाला बदनाम करणे, त्यांची हेटाळणी करणे, शिक्षकांना दुर्लक्षित करणे, त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे हे सर्व स्तरावर होत आहे.
ReplyDeleteठाणे जिल्ह्यातही पगार रखडलेत...
ReplyDeleteपुन्हा एकदा नंदकुमार साहेबांना आणा plz
योग्य मागणी आहे. सचिवांना हटवा.
ReplyDeleteशिक्षकांच्या वेतनाबाबत प्रशासकीय यंत्रणा योग्य दखल घेत नाही त्यामुळे वेतन नेहमीच उशिराने होतात यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे माहे फेब्रुवारी चे वेतन अजूनपर्यंत व्हायचे आहे *शिक्षक भारती ने वेतनाबाबत मांडलेली समस्या अभिनंदनीय आहे*
ReplyDeleteशिक्षकभारती नेहमी शिक्षकांच्या हितात असते
ReplyDeleteअतिशय वाईट परिस्थितीत शिक्षकांचे पगार न होणे म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही सर्व शिक्षक शिक्षक भारती च्या पाठीशी आहोत. जय शिक्षक भारती.
ReplyDeleteMr. Lahu Fakira Kokane from Mumbai
ReplyDeleteSir shikshak bharati done a good job
ReplyDeleteइतर शिक्षक आमदार यांनी सुद्धा लक्ष घातले पाहिजे. एक तारखेला पगार होणार म्हणले तेही होत नाही.
ReplyDeleteआपण न्याय देऊ शकत नसेल तर उपयोग काय?
परभणीत काय तीच बोंबाबोंब प्रत्येक महिन्याचा पगार पंधरा तारखेच्या पुढे होतो अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.
ReplyDeleteपगार वेळेत होणे आवश्यक आहे शिक्षकांना अनेक संघटना सामोरे जावे लागते
ReplyDeleteधुळे जिल्ह्यात पण हाच प्रकार चालू आहे.
ReplyDeleteहो.अगदी रास्त मागणी.सचिवांना हटवलेच पाहिजे.
ReplyDeleteशिक्षकभारती नेहमी शिक्षकांच्या हितात असते
ReplyDeleteहे काम फक्त शिक्षक भारती करते
ReplyDeleteजळगाव जिल्ह्य़ात कधीच वेळेवर पगार होत नाहीत सर . सहसा 15 ते 20 तारखे पर्यंत पगार होतात. होम लोन किंवा बँकांचे हप्ते वेळेवर भरले जात नाहीत..cmp प्रणाली सुरू करून स्टेट बँक ऑफ इंडियातच पगार हवेत. मा आमदार कपिल पाटील सरांचे मनःपूर्वक आभार कारण ते शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कायम खंबीरपणे उभे राहतात
ReplyDeleteहे काम शिक्षक भारती करणारच कारण शिक्षकांच्या प्रश्ना साठी अविरत काम करणारी संघटना म्हणजे ,शिक्षक भारती
ReplyDeleteखरच,
ReplyDeleteपगार फारच उशिरा होत .
पण बाकी संघटना मात्र याबाबत काहीच बोलतांना दिसत नाही.
यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे सुद्धा पगार झाले नाहीत...cmp..sbi....मोहीम यशस्वी होणे खूपच गरजेचे आहे....संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे......
ReplyDeleteश्रीमती वंदना कृष्णा,शिक्षण सचिव या शिक्षकांच्या समस्यां गांभीर्याने घेतच नाहीत,दुर्लक्ष करतात अशा निष्काळजी सचिवांची तात्काळ बदली झाली पाहिजे.
ReplyDeleteनांदेडला सुद्धा पगारी नाही झाल्या अजून
ReplyDeleteCMP प्रणाली सुरू होणे ही काळाची गरज आहे
ReplyDeleteअन्या याला वाचा फोडणारे .सर्वसामान्यांचा विचार करून कायद्याची चौकटीत बसून काम करणारे कपिल भाऊ पाटील साहेब
ReplyDeleteKapil Patil zindabad
ReplyDeleteकपिल पाटील जिंदाबाद
ReplyDeleteलढेंगे ! जितेंगे
ReplyDeleteआमदार कपिल पाटील साहेब जिंदाबाद.
ReplyDeleteअन्यायाला वाचा फोडणारे आ.कपिल पाटील साहेब व मोरे सर जिंदाबाद शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे प्रश्न न सोडविणा-या सचिवांना हटविणे गरजेचे आहे.एप्रिल महिना संपत आला तरी मार्च महिन्याचे पगार अजून झाले नाहीत.
ReplyDeleteअन्यायाला वाचा फोडली आणि सरकारी बाबूना वठणीवर आणले मा. आमदार कपिल पाटील साहेब आणि आपले तरूण तडफदार धडाडीचे मोरे सर जिदाबाद
ReplyDelete