अजितदादांचे वित्त सचिवांना शिक्षण विभागाकडून खुलासा घेण्याचे आदेश
दि. २२ एप्रिल २०२१ -
शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे व बेपर्वाईमुळे राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार रखडले आहेत. याबाबत आमदार कपिल पाटील यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून, वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शालार्थ प्रणालीत बदल करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव अद्यापही शिक्षण विभागाकडून वित्त विभागाकडे आला नसल्याचे लक्षात आले. यावर अजितदादांनी वित्त सचिवांना शिक्षण विभागाकडून तात्काळ खुलासा मागण्याचे आदेश दिले आहे. निदान आता तरी शिक्षक, शिक्षकेतरांच्या रखडलेल्या पगाराचा मार्ग मोकळा होईल आणि त्यांना दिलासा मिळेल असा विश्वास शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी व्यक्त केला आहे.
महिन्याची २० तारीख उलटून गेली तरी राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतरांचे अद्याप पगार झालेले नाहीत. शिक्षण विभाग आणि वित्त विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने पैसे येऊनही वित्त विभागाने बिलं नाकारली आहेत. याबाबतीत शिक्षण संचालकांनी पत्र लिहलेले आहे. परंतु अदयाप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कोषागार कार्यालयाने दिलेल्या सुचनेनुसार कार्यवाही करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये बदल करावा लागणार आहे. त्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून वित्त विभागाकडे कोणताच पाठपुरावा झाल्याचे दिसून येत नाही. यासाठी कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन शालार्थ प्रणालीमध्ये बदल होईपर्यंत प्रचलित पद्धतीनुसार शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार करावेत अशी मागणी कपिल पाटील यांनी अजित पवार यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
शालार्थमध्ये आवश्यक बदलाची कार्यवाही होईपर्यंत NPS ची कपातीची रक्कम प्रथमतः DDO च्या बँक खात्यावर घेऊन त्यानंतर DTO च्या खात्यावर वर्ग करणे व त्यानंतरच DTO खात्यावरून NSDL च्या खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेस मान्यता मिळावी. यासाठी शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग यांनी शालेय शिक्षण विभागास पत्रव्यवहार केला आहे. शालार्थ प्रणाली मध्ये NPS कपातसाठी आवश्यक हेड उपलब्ध होईपर्यंत उपरोक्त पद्धतीने प्रक्रियेस मान्यता देण्याचे आदेश वित्त विभागातील सबंधित अधिकारी यांना देण्यात यावेत, अशी सूचनाही पत्रात केली असल्याची माहिती मोरे यांनी दिली आहे.
इतर अनेक प्रश्नांबाबतही शिक्षण विभागाकडून वारंवार अशाप्रकारची दिरंगाई होत आहे आणि त्याचा फटका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शिक्षक भारतीने शिक्षण सचिवांना हटवायची मागणी केलेली आहे. याबाबतीत तात्काळ कारवाई न झाल्यास शिक्षण सचिव हटवायची मोहीम अधिक तीव्र करावी लागेल असा इशारा शिक्षक भारतीच्यावतीने सुभाष मोरे यांनी दिला आहे.
अतिशय रास्त मागणी आमदार कपिल पाटील महोदयांची प्रत्येक बाबतीत अन्यायाला वाचा फोडणारे आमदार म्हणून अख्या महाराष्ट्र मध्ये ख्याती आहे .आमदार साहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद! आतातरी झोपलेला अधिकारीवर्ग जागा होईल काय? श्री डी.जी. चौधरी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ तालुका शाखा जिंतूर. जिल्हा परभणी
ReplyDeleteधन्यवाद साहेब
ReplyDeleteधन्यवाद मोरे सर
Much needed step, Great job sir 🙏
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏
ReplyDeleteधन्यवाद सर,जय शिक्षक भारती!
ReplyDeleteधन्यवाद सर....
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteधान्यवाद साहेब..लढेंगे जितेंगे..जय शिक्षक भारती.
ReplyDeleteEducation secretary is against teachers. Time to time her attitude is shown with her decisions. She must removed.
ReplyDeleteजय शिक्षक भारती। आपण योग्य दिशेने वाटचाल करीत आहात.- सौ.मनिषा काळे.
ReplyDeleteहे सर्व कधी थांबणार............
ReplyDeleteद्रोणाचार्य हे प्रत्येक युगात, प्रत्येक पिढीत नव्हे तर कुठेतरी प्रत्येक शिक्षकात असतातच. पण त्यांची अवहेलना ही महाभारतापासून आजपर्यंत अगदी त्याच पद्धतीने आणि तशीच होत आली आहे. सरकार कोणतेही असो, त्यांनी शिक्षक वर्गावर अन्याय करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखा तो करत राहायचा आणि पुन्हा काहीही न झाल्यासारखे अनभिज्ञ राहून आपण समाजासाठी किती करतो याचा डंका पिटायचा, मग नेहमीप्रमाणे सर्व शिक्षक आमदारांमधून माननीय श्री कपिल पाटील साहेबांनी त्याबद्दल आवाज उठवला की मग जागे व्हायचे आणि पुन्हा उपकार केल्यासारखे, भीक दिल्यासारखे तोंडे वेंगांडून आपल्याच हक्काचे आपल्याला द्यायचे.
तत्त्वज्ञानाची गूढतत्वे योगयुक्तज्ञानाने चिंतून सिद्धत्व पावलेले असे स्वतःला समजणाऱ्या, स्वतःला शिक्षण क्षेत्रातील तपस्वी, ज्ञानचक्र प्रवर्तक समजणाऱ्या, तसेच
बुद्धिभ्रष्ट आणि आत्मनाशवृत्तीने वागणाऱ्या वृत्ती बाळावलेल्या, गुरुतत्वाला बळी देऊ पाहणाऱ्या,गुरु स्थानाचा खेळ मांडणाऱ्या आणि शाळेसारख्या पवित्र स्थानाचा विध्वंस करून ज्ञानक्षय करू पाहणाऱ्या, समाजकारण करण्याचे नाटक करणाऱ्या या राजकीय नेत्यांना शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी आणि शिक्षकांचे मन कधी कळणार कुणास ठाऊक.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteधन्यवाद माननीय श्री सुभाष मोरे सर धन्यवाद माननीय श्री कपिल पाटील साहेब
ReplyDeleteJai shikshakbharati
ReplyDeleteकोरोनाच्या महामारीत ही
ReplyDeleteकोणीतरी देवदूत आहेत
श्री कपील पाटील साहेबांच्यामुळे
प्रश्न मार्गी लागले आहेत
शिक्षक भारतीचे सर्वच गुरूदेव कार्यकर्ते
आहोरात्र झटत आहेत
त्यातही पाहिले नाहीत
परी सुभाष श्री मोरे सरांच्या सारखे
बावन्नकशी सोने लाभले आहे
आपली धडपड अतुलनीय आहे
कर्मचारी यांच्या वेतनाचा मार्ग
सुखर झाला आहे
शिक्षक भारतीस आमचा सदा सलाम आहे.
धन्यवाद
आपल्या प्रयत्नांना यश मिळणारच .शिक्षकांचा बुलंद आवाज शिक्षक भारती मा . आमदार कपिलजी पाटील साहेब, श्री सुभाव मोरे सर आपणास धन्यवाद
ReplyDeleteकपिल पाटील साहेब 1 च नंबर.तळमळीने काम करणारे नेतृत्व
ReplyDeleteआदरणीय आमदार कपिल पाटील सर व मोरे सर शिक्षकांच्या समस्यांबद्दल नेहमीच पुढाकार घेतात,साहेब आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल याबाबत तिळमात्र शंखा नाही.
ReplyDeleteआदरणीय आमदार कपिल पाटील सर व मोरे सर शिक्षकांच्या समस्यांबद्दल नेहमीच पुढाकार घेतात,साहेब आपल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल याबाबत तिळमात्र शंखा नाही.
ReplyDeleteCongratulation sir
ReplyDeleteकावळ्याचे बसणे आणि फांदीचे तुटणे एक होणार तर आता. म्हणजे पगार येणार आहे पण केव्हा तर 22 एप्रिल नंतर आता दोन महिने इनकम टँक्स कपात त्यानंतर अजूनही पगार नाही शिक्षक कसा स्वस्थ राहणार?😢☺️
ReplyDeleteआपल्या सारख्या दक्ष आमदारसाहेबांनमुळे शिक्षक आजून तरी चांगल्या स्थितीत आहेत.या पुढेही आपले सहकार्य असेच लाभावे हीच अपेक्षा.धन्यवाद साहेब 👏👏👏
ReplyDeleteशिक्षक भारती अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे.
ReplyDeleteअतीशय तळमळीने शिक्षक बांधवांच्या पगारासाठी दखल घेऊन प्रयत्न क्रुती केली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद साहेब
ReplyDeleteWeldon sirji
ReplyDeleteYou are a true fighter and teacher family M L A
धन्यवाद सर
ReplyDeleteखूप छान सर योग्य वेळी दखल घेतल्याबद्दल अत्यंत आभारी आहे सर खूप खूप धन्यवाद सर
ReplyDeleteThank you so much sir 🙏👍
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteजय शिक्षक भारती
ReplyDeleteजय शिक्षक भारती
ReplyDeleteजय शिक्षक भारती
ReplyDeleteजय शिक्षक भारती
ReplyDeleteअतीशय तळमळीने शिक्षक बांधवांच्या पगारासाठी दखल घेऊन प्रयत्न क्रुती केली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद...साहेब
ReplyDeleteअतीशय तळमळीने शिक्षक बांधवांच्या पगारासाठी दखल घेऊन प्रयत्न केले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद कपिल पाटील साहेब व मोरे साहेब आपले मनः पुर्वक धन्यवाद
ReplyDeleteखूप छान सर योग्य वेळी दखल घेतल्या बद्दल अंत्यत आभारी आहे ,सर खूप धन्यवाद.
ReplyDeleteखूप छान सर हे सर्व थांबले पाहिजेत किती दिवस असा पगारासाठी प्रत्येक वेळेला संघटनांनी प्रयत्न करायचे ज्याचं त्याला आपला आपलं काम समजले पाहिजे कामात दिरंगाई करणाऱ्या यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत कोणावरी कारवाई होत नाही तोपर्यंत यांच्याकडून काम नीट होणार नाही
ReplyDeleteप्रत्येक वेळेला शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन करणारे दहा जण बसलेले आहेत पण या ऑफिशियल काम करणाऱ्या लोकांचे मूल्यमापन कोण करणार यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत पगारासाठी असंच रडत बसावे लागणार का वाट पाहत बसावे लागणार का यांचे पगार कधी उशीरा झालेत का ते पहा यांचे पण पगार दोन दोन मिनिटे ठेवून बघा लेट करून बघा मग यांना समजेल इतरांच्या वेळेत पगार न होण्याचे महत्त्व यावर्षी कधी जागृतता निर्माण होणार
ReplyDeleteआपण करत असलेल्या कामाबद्दल आपले मनःपूर्वक आभार
ReplyDeleteआपण करत असलेल्या बहुमोल कामाबद्दल आपले मनःपूर्वक आभार
ReplyDeleteमा.कपिल पाटिल साहेब,व शिक्षक भारती खुप खुप आभार
ReplyDeleteआमदार साहेब आपले खूप खूप आभार
ReplyDeleteराञ दुबार शिक्षकांचा पण प्रश्न सर लवकरच
मार्गी लावा
ज्या शिक्षकांची प्राण नंबर आलेले नाहीत त्या शाळांनीपगार पत्रक फॉरवर्ड करू नये असे परिपत्रक आजच devare
ReplyDeleteसाहेबांनी टाकलेली आहे. कृपया तो आदेश रद्द करण्यास सांगावा आमदार साहेब धन्यवाद🙏
आमदार साहेब व शिक्षक भारती यांचे खूप खूप आभार सर कामात दिरंगाई करणा-यावर कारवाई होणे आवश्यक आहे.
ReplyDeleteThank you sir
ReplyDeleteYou are real fighter Patil saheb. Thank you sir
ReplyDeleteआपण करत असलेले काम हे निश्चित अतुलनिय आहे. तसेच राज्य आपणाकडे नेहमी आकसाने पहात असते माझी देव मला काही तरी दिल्या शिवाय थांबणार नाही हीच खररी कामाची पावती मिळवून देतील माझे देव.
ReplyDeleteमा आमदार कपिल पाटील साहेब,आदरणीय बेलसर सर,मोरे साहेब सर्वांचे आभार
ReplyDeleteThanks sir
ReplyDeleteThank u sir
ReplyDeleteThank you more sir ( jay shikshak Bharti)
ReplyDelete